निवडणुकीच्यावेळी उमेदवारांविरोधात नकारार्थी मत नोंदवण्याचा आणि निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार असायला हवा ,अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली होती .तथापि मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी हि मागणी धुडकावून लावली आहे . वास्तविक ,अशा अधिकारांच्या मागण्या करण्याऐवजी मुळात भ्रष्टाचारी उमेदवार निवडून येणार नाही,याची काळजी मतदारांनी घेण्यावरच भर द्यायला हवा .त्यासाठी मतदारांची जागृती आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक . आहे.त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतही काही बदल करावे लागतील
निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल आवश्यक आहेत ?