लोकशाहीचे चार स्थंभ निष्प्रभ ठरल्यामुळे पाचवा स्थंभ उदयास येत आहे .मुळात लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य , परंतु माघील ६४ वर्षे या चार स्तम्भाशी निगडीत लोकांनी स्वतः सर्वोच्च आहोत या थाटात पाचव्या स्थाम्भाची पिळवणूक केली .तुम्हाला प्रश्न पडला असेल कि चार स्तंभ तर आम्हाला माहीत आहेत ,हा पाचवा कोणता ? सामान्य जनता हाच लोकशाहीचा पाचवा अर्थात मूळ स्थंभ होय .कारण वरील चार स्थंभ ह्याच पाचव्या स्थाम्बावर उभे नव्हेत , नाचत आले आहेत, कारण ते विसरलेत ज्या वर आपण उभे आहोत (सामान्य जनतारूपी ) तोच जर आपल्यापासून दूर गेला तर धरणी माता सुद्धा आपल्याला जवळ करणार नाही.याचा अर्थ अण्णा आणि टीम पाचवा स्तंभ नह्वे तर त्यांच्या आंदोलनाला पाठीम्भा देणारी समान्य जनता होय .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा